गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात काहीशी सुधारणा होत आहे.सध्या कापसाचा भाव सरासरी ७ ते ७ हजार १०० रुपये दरम्यान आहे. मात्र दरवाढीच्या प्रतिक्षेत अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाच्या कापूसाची मोठ्या प्रमाणात साठवणूक केलेली आहे.

हंगाम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी सरासरी भाव ७ हजार ५०० रुपयापर्यंत गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास न ठेवता गरजेनुसार बाजाराकडे लक्ष ठेऊन, टप्प्या-टप्याने कापसाची विक्री करावी, असा सल्ला शेतीविषयक अभ्यासकांनी दिलेला आहे.

शेतकऱ्यांनी शक्यतो हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विक्री करू नये. सध्या बाजारात कापसाची आवक उत्तम आहे. भावात आणखी सुधारणा होऊ शकते. दोन-तीन महिन्यांत भावात चांगली सुधारणा होण्यास पोषक स्थिती आहे.

कापसातील आर्द्रता कमी झाली, गुणवत्ताही चांगली असून, सीसीआय देखील कापसाची खरेदी करीत आहे.त्यामुळे बाजाराला हमीभावाचा एक आधार निर्माण झाला आहे.बाजारातील सध्याचा सरासरी भाव हजारांच्या पुढे दिसतो.

मागील आठवड्याच्या तुलनेत कापसाच्या भावात २०० रुपयांनी घसरण झाली आहे.विशेष म्हणजे बाजारातील आवकही वाढत आहे.म्हणजेच आवक वाढत असतानाच कापसाचा भावही वाढत जाणार आहे.

सध्या बाजारात कापसाची आवक वाढली असून गाठीची आवक २ लाखांच्या टप्प्यात आहे.कापासाच्या दरातही सुधारणा होत असल्याचे दिसत आहे.यामागे उत्तम प्रतीचा कापसाची आवक होत असल्याने यात वाढ होत आहे.

तर सीसीआय देखील कापूस खरेदीसाठी बाजारात उतरलेले आहे.मागील आठवड्यापर्यंत कापसात ओलावा अधिक होता. पावसात भिजलेला कापूस होता. त्यामुळे गुणवत्ता कमी होती,हा कापूस सीसीआयने खरेदी केला नाही परंतु आता जवळपास साठवून ठेवलेला कापूस पूर्णपणे वाळलेला आहे.त्यातील ओलावा निघून गेलेला आहे.

बदलते हवामान आणि पावसाच्या लहरीपणामुळे यंदा राज्यासह देशभरातील कापूस उत्पादन घटले असून वापर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे आयात वाढण्याची शक्यता आहे.मागील हंगामात भारताने १७ लाख ५० हजार गाठी आयात केली होती.

चालू हंगामात भारत २५ लाख गाठी कापूस आयातीची शक्यता व्यक्त होत आहे.कापूस आयातीत यंदा ७.५ लाख गाठींची वाढ होण्याचा अंदाज आहे.यंदा देशातून कापूस निर्यात कमी राहण्याचा अंदाज आहे.

नुकत्याच सरलेल्या हंगामात भारताने २८ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात केली होती.यंदा कापूस उत्पादनात घटीचा अंदाज असून कापूस निर्यात १८ लाख गाठींवरच स्थिरावेल,असा अंदाज सीएआयकडून व्यक्त करण्यात आला आहे.