Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळलेलं यश हे ईव्हीएम घोटाळ्याचे यश असल्याचे महाविकास आघाडीचे अनेक नेते म्हणत आहेत. तर श्रीगोंद्याचे भाजप महायुतीचे नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी संदर्भात आक्रमक भूमिका घेत ईव्हीएमच्या प्रक्रियेवर तसेच निवडणूक आयोगावर विश्वास आहे.

या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर मी पहिल्यांदा राजीनामा देईल आणि निवडणुकीला सामोरं जाईल असं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना आ. पाचपुते म्हणाले, पूर्वी ब्लॅक अँड व्हाइट फोन यायचे, त्यावर तुम्ही फोटो पाठवू शकायचा का? आपण त्यात काहीच पाठवू शकत नसेल तर ईव्हीएममध्ये कसा बदल होऊ शकतो.

ईव्हीएमला कनेक्टिव्हीटीला काहीच ऑप्शन नसल्याचे सांगत ईव्हीएमची टेक्नोलॉजी रेडिओ टेक्नोलॉजी आहे. त्याच्यामध्ये कोणतीही फ्रिक्वेन्सी काम करु शकत नाही. हे सगळं निवडणूक आयोगाने सांगून देखील शंका उपस्थित केली जाते.

२०१९ साली ईव्हीएमची प्रक्रिया जवळून पाहिल्याचं सांगत. बबनदादा पाचपुते यांच्या निवडणुकीवेळी निवडणूक प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात होतो. त्यावेळी समोरच्या उमेवाराने आक्षेप घेतला होता. यानंतर व्हीव्हीपॅटची मतं आणि इव्हीएमची मतं मोजली गेली होती. ती दोन्ही बरोबर राहिली होती, त्यात काही चूक नव्हती असं विक्रमसिंह पाचपुते म्हणाले.

मतदारसंघात ३४५ मशीन आहेत, ३४५ मशीनची छेडछाड कशी होणार आहे. प्रत्येक बुथवरील पोलिंग बुथ एजंटच्या सह्या असतात, फक्त आरोप करुन दिशाभूल केली जातेय. त्यामुळे विरोधकांचा हा केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.

लोकसभेला विरोधक खूश होतो. ते महाराष्ट्राचा सुवर्णदिवस आहे, असं सांगत होते, अशी टीका देखील विक्रमसिंह पाचपुते यांनी केली. राम शिंदे भाजपचे नेते आहेत त्यांनी ईव्हीएम पडताळणीसंदर्भात अर्ज केलाय याबाबत विचारलं असता विक्रमसिंह पाचपर्तु यांनी निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचं म्हटलं.

या प्रक्रियेवर शंका निर्माण झाली तर विक्रमसिंह पाचपुते हा पहिला आमदार असेल जो राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं ते म्हणाले.