Ahilyanagar News : राज्यातील तापमानात एका दिवसात ४ अंशांनी घट झाल्याने अहिल्यानगरसह बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. थंडी आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवस तरी हुडहुडी कायम राहणार आहे.
गेल्या काही दिवसांत ‘फेंगल’ चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील थंडी चांगलीच वाढवली होती; पण वादळ जमिनीवर आल्यानंतर थंडी गायब झाली.
त्यानंतर आता पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी वारे व समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील किमान तापमान हे २० अंशांच्या जवळपास होते. त्यामुळे उष्णता जाणवत होती.
अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशांवर नोंदवले गेले. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत वाढ होईल.
रविवारपासून खान्देश, नाशिकपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार, दि. १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकूनराहण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लासह बहुतेक भागात जोरदार हिमवृष्टी होऊ लागली आहे. नाशिककरांना पुन्हा हुडहुडी एकाच दिवसात पारा ४ अंशांनी घसरून १२.५ वर आला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा हुडहुडी भरली आहे.
शनिवारी किमान तापमान १६.६ अंशावर होते. पहाटे धुके पसरलेले दिसून आले. धुळ्याचे तापमान ९.५ अंशांवर गेल्या आठ दिवसांपासून कमी झालेला थंडीचा जोर रविवार अचानक वाढला.
धुळे शहराच्या तापमानाचा पारा ९.५ अंशांवर आल्याची माहिती कृषी महाविद्यालयातर्फे देण्यात आली. नागपुरात पारा हळूहळू घसरत असल्याचे चिन्ह आहे.
फेंगल चक्रीवादळाचे सावट ओसरले असले तरी ढगाळ वातावरण नागपूरसह विदर्भात कायम आहे. ही स्थिती दोन दिवस कायम राहील, तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीही शक्यता आहे.