Ahilyanagar News : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी २०२५ रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहतूक बदलाबाबतचे माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक बदल १ जानेवारी २०२५ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरुन वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे- सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जावे.
सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे.
मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबाळ, शिरुरमार्गे नगरकडे जावे.
कोल्हापूर, सांगली, सातारा कारजमार्ग मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जगाच वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरुक जावे .
इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकी बंद करण्यात आल्याने या पुलावरुन केवळ अनुनायांच्या हलक्य वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमाग बाघोलीकडे जाणारी जडवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.